Friday 30 December 2011

म्हणे अश्या सचिनला ' भारत रत्न ' द्या !

बातमी ताजी आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सचिन तेंडूलकर याने आपल्या मुंबईतील नव्या बंगल्यात गृह प्रवेश करण्यापूर्वी आकयुपेशन सर्टिफिकेट न घेतल्या मुले त्याला ४ लाख ३५ हजाराचा दंड भरावा लागला. त्या बद्दल अनेकांनी मुंबई महानगर पालिकेला विनंत्या केल्या की एवढ्या महान खेळाडूला दंड करू नका म्हणून. मात्र म.न.पा. च्या निर्दयी अधिकाऱ्यांनी बिचार्या सचिनला दंडाची रक्कम भरायलाच लावली.( किती मोठा गुन्हा केला त्यांनी ) काही वर्षांपूर्वी याच सचिनला भेट म्हणून मिलेल्या फेरारी कार वरील आयात शुल्क ( जे की काही लाखाच्या घरात होते ) ते सुद्धा असेच माफ झाले होते ( तेव्हा पण या ' गरीब ' खेळाडूने स्वत आणि त्याच्या चाहत्यांनी सरकारवर असाच दबाव आणला होता ). मुंबई मधील आपल्या बंगल्याला वाढीव एफ .एस .आय. मिळावा म्हणून देखील त्याला कितीतरी आर्जव सरकारकडे करावी लागली. या कमी अनेक राजकीय धेंडानी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे आमच्या कानी आले आहे.

तर सांगायचे एवढेच की क्रिकेट , जाहिरातबाजी , हॉटेल आणि अन्य ज्ञात -अज्ञात मार्गांनी वर्षाकाठी अब्जावधी रुपये खोर्याने ओढणाऱ्या या खेळाडूची वृत्ती मात्र अगदीच शुद्र असल्याचे सत्य अनेकदा बाहेर आले आहे. आपण म्हणजे लोकांच्या गळ्यातले ताईत असल्यामुळे आपल्यासाठी देशातील सारे कर ,सारे दंड,सर्व कायदे आणि नियम शिथिल केले जावेत असा गोड गैरसमज या इसमाने करून घेतला आहे ( असे कित्येक महाभाग क्रिकेट आणि चित्रपट सृष्टी मध्ये आहेत ). 

आज देशातील सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी शेतकरी,कामगार ,शेत मजूर असे बहुसंख्य लोक आपल्यावरील कोणताही कर असो वा दंड असो निमुटपणे भारतात. वेळप्रसंगी पैश्याची तरतूद करण्यासाठी उधार-उसनवारी करतात, अगदी व्याजाने पैसे आणून सरकारच्या मढ्यावर घालतात. मात्र या उलट सचिन तेंडूलकर सारखे अब्जाधीश लोक ऐपत असतांनाही जमेल त्या मार्गाने सरकारी कर, दंड भरण्याचे टाळतात. दुर्दैव हे की त्यांच्यासाठी आमचे राजकारणी सवलतीची आणि माफीची शिफारस निर्लज्यपणे करतात मात्र,कधीच शेतकरी,शेतमजूर,कामगार आणि सामान्य माणसाकरिता असे अहमहीकेने भांडत नाहीत. एकूणच काय की चोर सोडून संन्याश्याला सुळावर देण्याचा खेळ राजरोसपणे सुरु आहे. व्वा रे सरकार...आणि व्वा रे सेलिब्रेटी..... म्हणे अश्या तेंडुलकरला ' भारत रत्न ' द्या ! कशाला ? या देशातील कर्तुत्ववान आणि प्रामाणिक लोक संपले आहेत काय ?

Tuesday 27 December 2011

स्वयम की सोच जगाओ.....देश का सम्मान बढाओ.....


  चार दिन पूर्व मैंने प्रसिद्ध कियी पोस्टमे सप्ताहमें एक दिन हिंदी भाषाका प्रयोग करनेका मन्तव्य प्रकट किया था ! किन्तु काफी लोगोने इसपर आलोचनाके तीर चलाये ! मैंने तो आपसे राय मांगी थी किन्तु आपने पुर्वाग्रह्दुषित प्रतिक्रियाये दियी ! यद्यपि मराठी मेरी मातृभाषा है किन्तु मै मराठी जितनाही हिन्दिका सम्मान करता हूँ ! हर भाषा की तरह हिंदिकी भी अपनी विशेषताए है,सुन्दरता है,सरलता है ! किन्तु मुज़तक आई प्रतिक्रियायोंमेसे यहाँ बात साफ़ हुई की हमारे समाजमे भाषा को लेकर काफी असमंजस फैला हुवा है ! विशेषकर कुछ एक राजनैतिक दल ईस बातका गलत फायदा उठाकर अपनी रोटिय सेंक रहे है ! कुछ लोगोने मेरे विधानको मराठिका अपमान समज़ा, तो कुछ्ने ईस बातको लेकर बेवजहही हिन्दिपर अपना गुस्सा उतरा ! कुछ्ने तो हिंदी हमारी राष्ट्र भाषा हो ही नहीं सकती यहातक कह डाला ! उन सभी महानुभावोंसे मेरा नम्र अनुरोध है की वे अपने अध्ययन ,आकलन तथा समजका दायरा बढ़ाये ! दक्षिणी भारतके लोग कथित आर्य-द्रविड़ विवाद के कारण हिन्दीको विरोध करते है तो हमभी उनकी नक़ल करे यहाँ कहातक सही है ? 
     दूसरा प्रश्न यह है की इंग्लेंडके युवराज पन्चम जोर्ज की भारत आगमन पर स्वागतगीतके रूपमे गया गया था वह स्वाधीनता संग्रामके महामंत्र वन्दे मातरम की जगह राष्ट्रगीत बन सकता है, हमारी अनादी संस्कृतिका प्रतीक केसरिया ध्वज हटाकर पश्चिमी देशोकी भ्रष्ट नक़ल वाला तिरंगा हम राष्ट्रिय निशान के रूपमे स्वीकार कर सकते है , तो देशमे सर्वाधिक लोगोंकी तथा सर्वाधिक प्रयोगमे लाये जानी वाली हिन्दी को राष्ट्र भाषाके रूपमे क्यों नहीं अपना सकते यहतो गोरे तथा काले अन्ग्रेजोका ( कोंग्रेस,कम्युनिस्ट तथा हिंदुविरोधी ताकते) षड्यंत्र है की देशमे भाषा,प्रान्त,जाती एवम धर्मके नाम पर खूनकी नदिया बहे,घर जले,इन्सान मरे ! हमारे संविधान की धरा ३४३ के खण्ड १ में बड़े स्पष्ट रूपसे लिखा गया है की " संघराज्य की राजभाषा देवनागरी लिपिमे लिखी जानेवाली हिन्दी है " किन्तु दुसरेही खण्ड में " संविधान लागु होनेसे १५ वर्षो तक तथा इससे पूर्व जिन कारणों के लिए अन्ग्रेजिका प्रयोग किया जाताथा वह यथास्थिति जारी रहेगा " ऐसा भी उल्लेख किया गया है ! यह हमारा दुर्भाग्य है की अबतककी निकम्मी सरकारोने ईस धारामें संशोधन करनेकी हिम्मत नहीं जुटाई ! 
     मै और एक नुकीला प्रश्न पूछना चाहता हु , की मराठी का गला कौन घोट रहा है ? यु.पि.के भय्या या साऊथ के अन्ना ? असलमे इनमेसे कोईभी नहीं बल्कि हमही हमारी मातृभाषा को कमजोर बना रहे है ! हमारे मराठी फ़िल्मी-नाट्य कलाकार,क्रिकेट खिलाडी तथा साहित्यिकोंको बोलते हुवे देखिये उनके मुहसे अन्ग्रेजिही छलकेगी ! ' मराठी मानुस'  के नामपर राजनीती करनेवाले राजनेताओंके  अभिभावक अंग्रेजी स्कुलोमे पढ़ते हुवे दिखेंगे ! मुजपर मराठी विरोध का आरोप  करनेवाले लोग जाकर उन सेलिब्रेटीजको क्यों नहीं पूछते की आप लोगोंको मराठी शब्द स्मरण में लानेमे ईतने कष्ट क्यों लगते है ? आपकी मातृभाषा तो मराठी है फिरभी आप सार्वजानिक तौरपर मराठी का प्रयोग करते समय ईतना लज्जित क्यों होते हो ? मुज़े पता है के यह बात पूछने की हिम्मत शायद ही कोई दिखा पायेगा !
     अन्तमे उन लोगोसे मै यही कहूँगा की स्वयम की सोच जगाओ.....देश का सम्मान बढाओ..... आज बस ईतना ही !

आमचा वर्षारंभ १ जानेवारी नव्हे ,चैत्र प्रतिपदा !


प्रिय बंधू-भगिनींनो ,
पाश्चात्य विकृतीचे अंधानुकरण करता,करता आम्ही आमचे स्वत्व विसरलो आहोत. आमचे आचार , विचार , संस्कार या सर्व बाबी इतिहास जमा होत चालल्या आहेत. दर वर्षी ३१ डिसेम्बरच्या रात्री मद्य धुंद तरुण-तरुणीचा धांगडधिंगा शरमेने मान खाली घालायला लावणारा असतो. मुळात आपले नवे वर्ष चैत्र प्रतिपदेला सुरु होते. त्या दिवशी पहाटे हा उत्सवसाजरा व्हावा. पण काही अज्ञानी जनता १ जानेवारीलाच नवे वर्ष सुरु होते असे समजून शिर्डीच्या साईबाबांना, शेगावच्या गजानन महाराजांना आणि आपल्या आराध्य देव-देवतांना जाऊन दर्शन घेते.अश्या लोकांना आपण नेमके काय करीत आहोत याचे जराही भान नसते.
     या दोन्ही उदाहरणांत भिन्नता असली तरी शेवटी हेतू मात्र एकच आहे आणि तो म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करणे. पद्धतीत बदल असला तरी मुळ भूमिका मात्र बदलत नाही. १ जानेवारीला वेगवेगळी थेरं करणारे हे वर्ष प्रतिपदेला मात्र  पार्श्वभागावर उन पडे पर्यंत पांघरुणातच पहुडलेले असतात. त्यांना हे भान मुळीच नसते की आज आपल्या नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे. खरे तर चैत्र प्रतिपदेला नवे वर्ष सुरु होण्यास मोठी प्राचीन परंपरा आहे. मात्र, आपला उज्वल इतिहास विसरलेल्या लोकांना याची तीळमात्र जाणीव नसते.या उलट ३१ डिसेंबरच्या रात्री आचरट चाळे करण्या पासून तर अगदी सभ्य पाने परस्परांना  " ह्याप्पी न्यू ईअर " च्या शुभेछा देण्यात ते धन्यता मानतात.  खरोखर आमच्या समाजाची ही अंधानुकारणाची पद्धत जगावेगळी आहे.हे चित्र बदलणे अत्यावश्यक आहे. नव्हे ही काळाची गरज आहे. कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही हे वैश्विक सत्य आहे. 
     असो, आज मात्र आपण एक निर्धार करूया ! येत्या ३१ डिसेंबर च्या रात्री आपल्यापैकी कोणीच राष्ट्रभक्त नव्या वर्षाच्या स्वागताच्या नवा खाली विदेशी विकृतीच्या समोर मानझुकविणार नाही आणि इतरांनाही झुकवू देणार नाही.समर्थ भारत केंद्राच्या या आवाहनास प्रतिसाद द्या आणि नवे वर्ष १ जानेवारीला नव्हे तर गुढी पाडव्याला साजरे करा.   .....................................................वंदे मातरम !!!